श्राध्द म्हणजे काय

आपल्या पिढीजात परंपरांचे स्विकृत तत्व म्हणजे मनुष्य प्राणी मृत्यु पावतो परंतु त्याचा आत्मा मात्र अमर आहे. तो नष्ट होत नाही. आपल्या संस्कृतीमध्ये आई-वडिलांच्या आपल्या मुलांविषयी ममतेला महत्त्व आहे. तसेच आई-वडिल हयात असतांना मुलाच्याही त्यांच्या संदर्भात काही जबाबदार्‍या आहेत. त्यांच्या उतारवयात त्यांची व्यवस्थित देखभाल करणे, त्यांचा योग्य तो मान-सन्मान ठेवणे वगैरे. आई-वडिलांच्या पश्चातही त्यांच्या मुलांच्या काही जबाबदार्‍या त्यापैकी महत्वाची म्हणजे 'श्राध्द' ह्या एक विशिष्ट पध्दत आपल्या धार्मिक परंपरेत आपल्या पुर्वजनांनी घालवून दिलेली आहे. श्राध्द जर विधीपुर्वक केले तर आपले पितर संतुष्ट होतात. आपल्या वारसांना दिर्घायुष्याचा, प्रसिध्दीचा, शक्तिचा, उत्तम प्रकृतीचा आणि लौकिक सुखाचा, धनसंपदेचा आर्शिवाद देतात.
मृत मातापित्यांसाठी विधिपूर्वक केलेल्या आपल्या पारंपारिक शास्त्रामध्ये पितृयज्ञ असे म्हटले आहे. आपल्या पारंपारिक शास्त्रात मयत पितरे आपल्या कुटूंबाचे मृत्युनंतरही रक्षण करतात असे नमुद केलेले आहे आणि म्हणुनच वारसांची ही अत्यंत महत्वाची जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या पितरांना प्रसन्न ठेवावे.

विविध तर्‍हेच्या श्राध्दाच्या पध्दतीचे विवरण पुढीलप्रमाणे

  • और्ध्वदाईक वा अंत्योष्टि - हा विधि मयत मनुष्याच्या कुटूंबातील सदस्यांनी करावयाचा असतो, ह्यासाठी एक विशिष्ट तिथी ज्या दिवशी व्यक्ती निधन पावली ती अतिशय महत्वाची असते. त्या तिथीला प्रत्येक वर्षी श्राध्दाचा विधि करावयाचा असतो. दुसर्‍या शब्दात ह्यालाच संवत्सरीक श्राध्द म्हटले जाते.
  • काम्य श्राध्द - श्राध्दाचा पारंपारीक विधी शास्त्रशुध्द पध्दतीने करतांना एक विशिष्ट इच्छेला मनात ठेवून तिच्या इच्छापूर्तिसाठी केलेल्या श्राध्दाला काम्य श्राध्‍द म्हणतात. नारायण, नागबळी आणि त्रिपिंडी ह्या तीन प्रकारच्या श्राध्दांना 'काम्यश्राध्द' किंवा 'महालय श्राध्द' असे म्हणतात. याचेच दुसरे नाव परवण श्राध्द असे आहे. प्रत्येक पंचागांत भाद्रपद महिन्याच्या पानावर शास्त्रशुध्द पध्दतीने श्राध्द कसे आणि केंव्हा करावे याचे सविस्तर वर्णन सापडते.
  • एकोदिष्ट श्राध्द - त्रिपिंडी श्राध्दालाच एकोदिष्ट श्राध्द म्हणतात.
careful
apps-banner
यजमान आणि यात्रेकरुकरीता महत्त्वाची माहिती      
© Copyright 2015 All rights reserved at Shikhare B. S.